Posts

Showing posts from May, 2020

मुलं तणावात आहे कसं ओळखाल? जाणून घ्या त्यांच्यात होणाऱ्या ‘या’ पाच बदलांविषयी

सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडू शकतं रायन पिंटो सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे.  १. अबोला- तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे असाल, तर घरी राहणाऱ्या मुलांशी व्हिडीओ कॉल किंवा ...

मुलांमधील गुण

मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही. काटकसरी वस्तू वापरण्याची सवय असली की मन हे शोधत राहतं, आपण उधळपट्टी तर करत नाही ना? स्वत:ला अनेक दिवस हे शिकवावं लागतं. ते अचानक होत नाही.  - तू मला आवडतेस. - माझा तुझ्यावरच विश्वास आहे. - हे तू छान केलंस हं! - तुझं मत मला सांग. - माझं चुकलं बरं का!  वरील पाच वाक्यं मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. आपण आपल्या आई-वडिलांना आवडतो ही भावना छान असते. आपण थोडेच आपल्या मुलांना 'आय लव यू, आय लव यू' असं म्हणणार आहोत? आपलं प्रेम त्यांना आपल्या वागण्यातूनच कळायला हवं. डोळे, भुवया, कपाळ हा भाग मुलांकडे पाहताना जाणीवपूर्वक प्रसन्न ठेवावा. नाही तर कपाळाला आठय़ा घालून, भुवयांचा संकोच करून, डोळे वटारूनच मुलांकडे पाहिलं जातं. असं होऊ नये. पाठीवरून प्रेमानं हात फिरवला की मुलांपर्यंत आपली माया पोचते. मुलाचा चेहरा उतरलेला दिसला की काय झालं बाबा? असं काळजीनं विचारलं की त्याची अर्धी चिंता दूर होते. 'मुलं ऐकतील असं बोलावं कसं आणि मुलं बोलतील असं ऐकावं कसं?' ऌ६ ३ ळं'' र ङ्र२ि ह्...

ओळख

Image
आज अश्या एका मुद्द्यावर बोलण्याची गरज निर्माण झाली, की जो मुद्दा नेहमी दुर्लक्षित केला जातो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन एकत्र / संपर्कात राहतात. उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप ग्रुप इ ... माध्यमातून लोक संपर्कात राहतात. आज व्हाट्सअँप ग्रुपचा वापर जास्त केला जातो. मग हे ग्रुप एकत्र शिकत असतात म्हणून बनवले जातात, कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा असतो, सामाजिक क्षेत्रात काम करत असतो म्हणून त्या त्या चळवळीचा ग्रुप असतो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांची एकमेकांशी वेगवेगळ्या माध्यमातून ओळख होते, ती कधी एकत्र काम करताना तर कधी काही कार्यक्रमात ओळख होते तर कधी कॉमन मित्राकडून ओळख होत असते. अश्याच ओळखीतून खूप वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि ओळखी वाढतात. काहींसोबत ही ओळख फक्त चेहऱ्याने होते, तर काहींसोबत नावाने होते, तर कधी ही ओळख अगदी मैत्रीच्या पातळीवर होते. ही ओळख अश्या वेगवेगळ्या प्रकारची असते. अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आपले मित्र किंवा सामाजिक कार्यकर्ते एकमेकांना ऍड करतात. हे ग्रुप कामाच्या नियोजनासाठी असता...

येत्या काळात व्यवसायिक सामाजिक कार्यकर्त्या समोरील आव्हाने!!!

- covid-19 या महामारीचा अनुभव आपल्या सगळ्यांचा पहिलाच आहे, या लॉक डाउन चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, या परिस्थिती मध्ये आपण जिथे आहोत तिथे आपण प्रयत्नशील आहोत, झुंजतोय,  हातावरच पोट असलेल्या कुटुंबांना अन्न पुरवणं, वेश्या व्यवसायातील महिलांना मदत करणं, अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबांना आधार देतोय, आरोग्य क्षेत्रात देखील जमेल ती जबाबदारी उचलत आहोत, या परिस्थितीत खचलेल्या सर्व सामन्यासाठी समुपदेशन आपण करतोय, विविध ऑनलाइन चर्चा सत्र, वेबिनार आपण घेत आहोत.   अश्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या या इच्छाशक्तीला व जिद्दीला सलाम.  - खर पाहिलं तर ही झुंज आत्ता सुरू झालीय, कारण लॉक down नंतर मोठी आव्हान आपल्याला पेलवायची आहेत, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे, त्याची तयारी आत्तापासून करायला हवी आहे. कुठल्या आव्हानांची शक्यता वाटते आहे - आर्थिक संकट!! सर्वच वर्गातील माणसां समोर हे संकट उभं राहिल, एखादा वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी धरपडेल तर एखादा वर्ग भांडवली व्यवस्थेत टिकण्यासाठी प्रयत्न करेन.  दारिद्र्याचे दुष्ट चक्र व त्या पाठोपाठ येणारे प्रश्न. बेरोजगारी, नैराश्...