Posts

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

Image
राजूर येथे ५५ अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. मात्र, माध्यमांमध्ये झळकलेल्या घटनाच आपल्याला दिसतात; ज्या घटना समोर येत नाहीत, ज्या बालिका भीतीपोटी किंवा सामाजिक दबावामुळे बोलू शकत नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा आहे. बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, अल्पवयीन गर्भधारणा आणि बालकांवरील हिंसा या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या समाज, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामूहिक अपयशाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत प्रतिबंधात्मक (Prevention-Based) पातळीवर सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक काम होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. केवळ एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे किंवा आरोपींना अटक करणे पुरेसे नाही. बाल संरक्षण ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून, ती संपूर्ण सामाजिक आणि प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त जबाबदारी आहे. बालकांसोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची  पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती, गाव बाल संरक्षण समिती, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रण...

संविधानिक भूमिका घेताना...

Image
संविधानाबद्दल बोलताना आणि वागताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. मात्र संविधानिक भूमिका म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही विषयावर प्रभावीपणे काम करायचे असेल तर त्या विषयाची स्पष्टता असणे गरजेचे असते. त्यामुळे संविधानिक भूमिका घेताना आपण कोणत्या स्तरावर, कोणत्या भूमिकेतून आणि कोणत्या व्यवस्थेसंदर्भात विचार करत आहोत, याचा बारकाईने विचार होणे आवश्यक आहे. भारतामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक व्यवस्था अस्तित्वात आहेत. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थांना भारतीय संविधानाचा आधार मिळाला. संविधानात बदल करतानाही त्याच्या मूलभूत मूल्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवस्थेची नियमावली स्वतंत्र असली तरी तिचा आधार संविधानिक मूल्यांवरच असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक अशा तीन स्तरांवर जीवन जगत असते. या तिन्ही स्तरांवर निर्णय घेताना संविधानिक मूल्यांचा संदर्भ वेगळा असतो. अनेकदा व्यक्तिगत किंवा कौटुंबिक निर्णय घेताना सामाजिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांची गल्लत होते आण...

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...

Image
सरकारी शाळा बंद होऊ नयेत ही भूमिका समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि आवश्यक आहे. मात्र ही भूमिका केवळ भावनेवर आधारित न राहता, ती पूर्णपणे बालकेंद्री, वास्तवाधारित आणि जबाबदार विचारांवर उभी राहिली पाहिजे. सरकार शाळा बंद किंवा विलीन करण्यामागे कमी पटसंख्या, संसाधनांचा वापर, स्थलांतर इत्यादी कारणे देत असते. पण या पार्श्वभूमीवर आपण एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे,  शाळा सुरू ठेवणे म्हणजे त्या मुलाला खरोखरच गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध शिक्षण मिळत आहे का? विशेषतः ज्या शाळेत एकच विद्यार्थी आहे, अशा ठिकाणी त्या मुलाचा सर्वांगीण विकास होतो का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळा ही केवळ अभ्यास शिकवण्याची जागा नसून ती मुलाच्या सामाजिक, भावनिक आणि वैचारिक विकासाची जागा असते. मित्रांसोबत संवाद, गटात काम, स्पर्धा, सहकार्य, खेळ या सगळ्या गोष्टी मुलाच्या व्यक्तिमत्त्व घडवतात. एकट्या विद्यार्थ्याच्या शाळेत हे अनुभव जवळजवळ नसतात, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि शिकण्याची प्रेरणा कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच, शाळा अस्तित्वात असली तरी शिक्षणाचा आत्मा कमी पडतो....

सेवा दल बढाना है, परिवर्तन लाना है!

Image
सेवा दल ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक विचारधारा आहे- समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर उभी असलेली एक चळवळ. या चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर समानपणे आहे. त्यामुळे *“आपण कोणत्या गटात आहोत?” यापेक्षा “आपण सेवा दलासाठी काय करतो आहोत?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.* आज देशात जे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वातावरण निर्माण झाले आहे, ते पाहता सेवा दलासारख्या संघटनांची भूमिका अधिक निर्णायक ठरते. अशा वेळी आपण अंतर्गत मतभेद, वैयक्तिक अहंकार, जुने वाद किंवा व्यक्तीगत भावना यामध्ये अडकून राहिलो, तर आपण आपल्या मूलभूत ध्येयापासून दूर जाऊ. त्यामुळे ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आणि एकत्र येण्याची. संघटनेत मतभेद असणे हे नैसर्गिक आहे, कारण विचार करणाऱ्या लोकांमध्ये विविधता असतेच. पण हे मतभेद जर संवादाने, आदराने आणि सामोपचाराने सोडवले, तर ते संघटनेला अधिक सक्षम बनवतात. उलट, जर तेच मतभेद वादात, गटबाजीमध्ये किंवा वैयक्तिक संघर्षात रूपांतरित झाले, तर ते संघटनेला कमकुवत करतात. त्यामुळे “मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत” ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. चुका होणे ह...

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

Image
नवीन ट्रेक, नवीन मित्र... आणि निसर्गाच्या कुशीत हरवलेली एक अविस्मरणीय भटकंती! आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. कात्रज बोगद्यापासून सुरू झालेली ही वाट – सिंहगडपर्यंत – केवळ चाल नाही, तर एक जिवंत अनुभव होता! अनेक डोंगर-टेकड्या, खिंडी, चढ-उतारांचा प्रवास, जवळपास १५-१६ किलोमीटरची पायपीट आणि तब्बल ५-६ तासांची भटकंतीने थकवा येईल असे वाटले तरी अनुभव मात्र थकवणारा नव्हता, तर उलट उत्साहवर्धक ठरला. डोंगररांगेवर चढताना एका बाजूला गजबजलेले पुणे शहर आणि दुसऱ्या बाजूला शांत, निळसर-हिरवट रंगांनी नटलेला निसर्ग — मनाला एक वेगळीच शांती देत होता. मध्येच कोवळं ऊन, मधूनच पावसाच्या सरी, तर काही वेळा ढगांची साऊली — निसर्गानेही जणु या भटकंतीला सोबत करत होता. ट्रेक दरम्यान वरून बघताना सिंहगड किल्ला ढगांत लपलेला दिसत होता. त्याच्या टोकावरचा टॉवर जणू आपल्याला खुणावत होता – “चला, थोडं अजून…!” सिंहगडाचे हे खुनावणे आम्हाला थांबू देत नव्हती. सिंहगडापर्यंत पोहचण्याची उर्जा त्याच्याच असण्यातून मिळत होती. राकेश पाटील मागे परदेशी सर, आणि मधून मधून एकमेकांना प्रोत्साहन देणारे सर्व सहकारी...

प्रेम, कायदा आणि बालकांची सुरक्षा — एक संवेदनशील दृष्टिकोन

Image
प्रेम ही मानवी भावना आहे – कोमल, निरागस, पण ती व्यक्त करताना समोरच्याच्या भावना, वय, सामाजिक स्थळ, आणि कायदेशीर सीमा यांची जाणीव ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः जेव्हा गोष्ट अल्पवयीन मुलांशी संबंधित असते, तेव्हा ही संवेदनशीलता अधिक गहिरी आणि जबाबदारीची असते. भारत सरकारने २०१२ साली लागू केलेला POCSO (Protection of Children from Sexual Offences) Act याच भावनेतून प्रेरित आहे – बालकांची शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक सुरक्षितताही अबाधित राहावी यासाठी. अलीकडील एका न्यायालयीन प्रकरणात, ३५ वर्षीय पुरुषाने १७ वर्षीय मुलीचा हात धरून “I love you” म्हटल्यावर, न्यायालयाने त्यात लैंगिक हेतू आढळत नाही म्हणून आरोपी निर्दोष ठरवला. या निर्णयावर समाजात चर्चा सुरू झाली – आणि ती चर्चा चांगली आहे, कारण ती आपल्याला आपली भूमिका, मूल्यं आणि जबाबदारी पुन्हा तपासायला भाग पाडते. काय आहेघटनाक्रम? या प्रकरणात, आरोपीने एका अल्पवयीन मुलीशी फक्त एकदाच संवाद साधला – तोही "I love you" असं म्हणून. या कृतीत कोणताही अश्लील स्पर्श, पाठलाग, धमकी किंवा शारीरिक अत्याचार नव्हता. यावरून न्यायालयाने निष्कर्ष ...

जबाबदारी आणि नैतिकता

Image
समाजात अशांतात पसरेल, समाजा-समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे असंविधानिक आहे. असंविधानिक वागणे किंवा बोलणे ज्यातून शोषण होत असेल, हिंसा होत असेल किंवा द्वेष निर्माण होत असेल तर अश्या व्यक्तीवर कारवाई व्हायलाच हवी. मग ही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो. आणि हे सर्व जर जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून कारवाई व्हायला हवी. मग ही व्यक्ती सरकारमध्ये असो, किंवा कोणत्याही राजकिय पक्षात असो किंवा कोणत्याही सामाजिक संघटनेत / संस्थेत असो किंवा यापैकी कोणत्याही जबाबदार पदावर असो त्या व्यक्तीने नैतिक जबाबदारी म्हणून स्वतः राजीनामा द्यायला हवा. असे होत नसेल तर इतर जबाबदार नागरिकांनी / सदस्यांनी त्या व्यक्तीचा पायउतार करायला हवा. पण असे होताना सध्या दिसत नाही. जबाबदार पदावर असलेले लोकं बेताल वक्तव्य, बलात्कार, छेडछाड, बलात्कारी व्यक्तीला वाचवत / समर्थन करत, हिंसा करत राहतात.  आणि हितसंबंध असलेलं लोक अश्या लोकांची वकिली करत राहतात त्यामुळेच त्यांना मोकळं रान मिळतं. (कदाचित वकिली करणारे देखील अश्याच कोणत्या तरी घटनेत सामील असतात आणि ती घटना बाहेर येऊ नये आणि...